Ativrushti Nuksan Bharpai Yadi : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा जाहीर केला आहे. सरकारने १,३३९ कोटी ४९ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या जिल्ह्यांना मिळणार मदत
राज्य सरकारने राज्यातील २० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर केली आहे. यामध्ये खालील विभागांचा समावेश आहे:
- अमरावती विभाग: अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी ५६५.६० कोटी रुपये मंजूर.
- नागपूर विभाग: गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी २३.८५ कोटी रुपये मंजूर.
- पुणे विभाग: कोल्हापूर जिल्ह्यासाठी १४.२८ कोटी रुपये मंजूर.
- छत्रपती संभाजीनगर विभाग: हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी ७२१.९७ कोटी रुपये मंजूर.
- नाशिक विभाग: नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी १३.७७ कोटी रुपये मंजूर.
मदतीत कपात: दोन हेक्टरची मर्यादा लागू
राज्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, सरकारच्या नव्या नियमांमुळे ही मदत अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे.
- यापूर्वी ३ हेक्टरसाठी मदत मिळत होती, ती आता कमी करून जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.
- त्यासोबतच, सरकारने मदतीच्या दरातही कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळण्याची शक्यता आहे.
ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.